टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी;फॅन्स म्हणाले, '2027 चं स्वप्न जगतोय'

Rohit Sharma Emotional: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले. प्रथमच आयसीसी ट्रॉफी पटकावताना भारताने 7 बाद 298 धावांचा बचाव करत दक्षिण आफ्रिकेला 45.3 षटकांत 246 धावांवर रोखले. हा विजय मिळवून टीम इंडियाच्या महिलांनी 2005 व 2017 च्या अंतिम पराभवांचा बदला घेतला. दरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा या विजयानंतर भावूक झालेला दिसला. 

रोहित शर्मा इमोशनल

स्टार फलंदाज रोहित शर्मा स्टँडमध्ये पत्नी रितिकासह सामना पाहत होता. या विजयाने 2023 पुरुष विश्वचषक फायनलच्या पराभवानंतरच्या त्याच्या जखमेवर फुंकर घातली. यामुळे रोहितच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. रोहित शर्मा यावेळी जय शाह, नीता अंबानींसोबत उत्साहाने सामना अनुभवत होता. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला. यानंतर रोहित शर्मा 2027 चं स्वप्न प्रत्यक्षात जगतोय, अशी प्रतिक्रिया हिटमॅनच्या फॅन्सनी दिलीय.

फलंदाजांनी रचला मजबूत पाया

नाणेफेक हरल्यानंतर शेफाली वर्माने 87 धावांची तुफानी खेळी करत स्मृती मंधानासोबत 104 धावांची सलामी जोडी रचली. जेमिमा व हरमनप्रीत लवकर बाद झाल्या तरी दीप्ती शर्माने 58 चेंडूत 58 धावा ठोकत टीमला सावरले. रिचा घोषच्या 24 चेंडूत 34 धावांच्या झंझावातामुळे भारत 298 पर्यंत पोहोचला.

गोलंदाजीचा भेदक मारा 

299 धावांच्या लक्ष्यापुढे लॉरा वोल्वार्ड्टने 101 धावांचे शतक ठोकले. सून लुससोबतची भागीदारी धोकादायक वाटली, पण ताझमिन ब्रिट्सच्या धावबादाने भारताला ब्रेक मिळाला. दीप्ती शर्माने वोल्वार्ड्ट, ट्रायॉन व नादिन डी क्लार्कला बाद करत 5 विकेट्स मिळवल्या. शेफालीनेही चेंडूने कमाल करुन दाखवली.

ऐतिहासिक उत्सव

दीप्तीच्या शेवटच्या विकेटनंतर हरमनप्रीतने झेल टिपत विजयावर मोहर उमटवली. मैदानावर खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला. हा क्षण केवळ ट्रॉफी नव्हे, तर भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचे फॅन्स म्हणतायत. 

FAQ 

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक कधी आणि कुठे जिंकला?

उत्तर: भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयसीसी महिला विश्वचषक २०२५ ची अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५२ धावांनी जिंकली.

   

अंतिम सामन्यात रोहित शर्मा कसा भावुक झाला?

उत्तर: रोहित शर्मा पत्नी रितिकासह स्टँडमध्ये सामना पाहत होता. २०२३ पुरुष विश्वचषक फायनलच्या पराभवानंतरच्या जखमेवर फुंकर घालताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याने “मुलींनी माझे २०२७ चे स्वप्न पूर्ण केले” असे भावुक उद्गार काढले.

सामन्यातील प्रमुख खेळाडूंची कामगिरी काय होती?

उत्तर: फलंदाजीमध्ये शेफाली वर्माने ८७ धावा, स्मृती मानधनासोबत १०४ धावांची भागीदारी, दीप्ती शर्माने ५८ धावा आणि रिचा घोषने ३४ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये दीप्ती शर्माने ५ विकेट्स घेतल्या, तर लॉरा वोल्वार्ड्टने दक्षिण आफ्रिकेकडून १०१ धावांचे शतक ठोकले.

2025-11-03T01:40:48Z