'ट्रॉफी तुमची नाहीये... ACC च्या कार्यालयात ठेवा', मोहसिन नक्वीला बीसीसीआयने सुनावले खडे बोल

 Asia Cup 2025 : भारताने आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या मिटिंगमध्ये एसीसीचे चेअरमन मोहसिन नक्वी (Moshin Naqvi) यांच्याबद्दल आपला विरोध दर्शवला. बैठकीत असलेल्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सुनिश्चित केले की नकवींनी टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा द्यायला हव्यात. राजीव शुल्का आणि आशिष शेलार यांनी मागणी केली की आशिया कप ट्रॉफी लगेचच एसीसी मुख्यालयाला देण्यात यावी. भारताने पाकिस्तान क्रिकेटच्या प्रमुखांना हे देखील सांगितलं की ते हे प्रकरण आयसीसीपर्यंत नेणार आहेत. एसीसी प्रमुखांच्या वृत्तीचा निषेध म्हणून आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बैठकीमध्येच बहिष्कार टाकला.

बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी खजिनदार आशीष शेलार यांनी केलं होतं. दोघेही एसीसी बोर्डाचे सदस्य आहेत. दोघांनी मिळून मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयात तात्काळ जमा करावी अशी मागणी केली आणि पाकिस्तानी संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्यास तयार असल्याचेही कळवले. नोव्हेंबरमध्ये याविषयी एक बैठक पार पडणार आहे. 

आशिष शेलार यांनी बैठकीवर टाकला बहिष्कार : 

राजीव शुक्ला हे एसीसी बोर्डावर बीसीसीआयच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत, तर आशिष शेलार हे पदसिद्ध बोर्ड सदस्य आहेत. एसीसी प्रमुखांच्या निषेधार्थ आशिष शेलार बैठकीतून मध्येच बाहेर पडले आणि त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. 

नक्वीकडे आशिया कपची ट्रॉफी : 

सोमवारी एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये मोहसिन नक्वी आशिया कप ट्रॉफी घेऊन निघून गेल्यानंतर त्यांनी ट्रॉफीचा "वैयक्तिक ताबा" घेतला असल्याचं भारताचं मत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कपच्या अंतिम सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. यानंतर, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचे गृहमंत्री नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. 

हेही वाचा : गौतम गंभीरचा 'गँगस्टर' मोड, हारिस रौफने भारतीय खेळाडूंना डिवचल्यावर कोचला राग झाला अनावर, समोर आला Unseen Video

 

FAQ : 

एसीसी बैठकीत भारताने मोहसिन नकवी यांच्याबद्दल काय विरोध दर्शवला?

उत्तर: भारताने एसीसी बैठकीत मोहसिन नकवी यांच्या वृत्तीचा निषेध केला. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सुनिश्चित केले की नकवींनी टीम इंडियाला आशिया कप विजयाच्या शुभेच्छा द्याव्यात.

राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी काय मागणी केली?

उत्तर: त्यांनी आशिया कप ट्रॉफी तात्काळ एसीसी मुख्यालयात (दुबई) जमा करण्याची मागणी केली आणि पाकिस्तान क्रिकेट प्रमुखांना सांगितलं की हा मुद्दा आयसीसी पातळीवर उपस्थित करणार आहोत.

आशिया कप ट्रॉफीबाबत काय घडलं?

उत्तर: अंतिम सामन्यानंतर मोहसिन नकवींनी ट्रॉफी घेऊन निघून गेली आणि त्यांनी तिचा "वैयक्तिक ताबा" घेतला असल्याचं भारताचं मत आहे. भारतीय खेळाडूंनी नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

 

2025-09-30T15:39:33Z