मुंबई : भारताकडून पराभव पत्करल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याला आपल्या संघाचा अभिमान वाटतो. ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाचे टॉपचे ३ फलंदाज अवघ्या ११ धावांवर बाद झाले होते. त्यानंतरही संघाने ३३२ धावांपर्यंत मजल मारली. या कामगिरीमुळे कर्णधाराला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. या धावसंख्येच्या पाठलागात दक्षिण आफ्रिकेने भारताची धाकधूक वाढवली होती, परंतु अखेरीस सामना भारताच्या बाजूने झुकला. ३५० धावांच्या पाठलाग करताना आफ्रिकेला भारताने ३३२ धावांवर ऑल आऊट केलं. सामना संपल्यावर आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
मला गर्व आहे, चेंजिंग रूममध्ये बसून खेळाडूंना त्यांचे काम करताना पाहणे खूप छान वाटले. आम्ही काहीतरी करू शकतो, विश्वास आम्ही कधीही गमावला नाही. डाव पुढे सरकत असताना खेळाडू खूप आशावादी होते. हे पाहून खरोखरच चांगले वाटले आणि मला आमच्या प्रयत्नांचा खरोखर अभिमान आहे. टॉप ऑर्डर कदाचित सर्वात जास्त अपयशी ठरली. आम्हाला माहित होते की चेंडू स्विंग होईल आणि नंतर धावांचा पाठलाग करताना विकेट थोडीशी वर येईल, परंतु तरीही असे वाटले की पाठलाग करणे हा सामना जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे मार्करम म्हणाला.
छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे टॉप ऑर्डर. ५० षटके हा खूप वेळ असतो आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा असे क्षण येतात की कदाचित एका षटकात १८ धावांच्या जागी फक्त १२ धावाच दिल्या असत्या, त्याबद्दल जास्त विचार करत नाही, पण नंतर शेवटच्या क्षणांपर्यंत येतो, जसे मी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही मागे वळून त्या क्षणांबद्दल विचार करता. पण एकंदरीत, प्रयत्नांचा खूप अभिमान आहे. ते जवळ आले आणि खूप चांगले व्यक्तिमत्व दाखवल्याचं मार्करमने सांगितलं.
दरम्यान, या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने आपले ५२ वे शतक पूर्ण केले. भारताकडून फक्त वन डे क्रिकेट खेळणाऱ्या कोहलीने त्याची ताकद दाखवून दिली. १३५ धावांच्या खेळीने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. वन डे मालिकेमध्ये भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
2025-12-01T03:08:20Z