मुंबई इंडियन्सने 'आकाश' दाखवल्यानंतर गौतमची नोकरी जाणार? लखनौचे मालक मेंटॉर गंभीरवर भडकले

नवी दिल्ली: आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने लखनौचा ८१ धावांनी पराभव करून त्यांना आयपीएल २०२३ मधून बाहेर काढले. मुंबईविरुद्ध लखनौने आधीच नमते घेतले होते. संपूर्ण सामन्यात हा संघ कुठेही लढताना दिसला नाही, असे म्हणावे लागेल. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईने लखनौला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कृणाल पांड्याचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १६.३ षटकांतच १०१ धावा करत ऑलआऊट झाला.

गंभीरने समजावण्याचा प्रयत्न केला पण

यावेळी गोयंका यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. गंभीर त्यांना समजवण्याचा प्रयत्नही करताना दिसला. लखनौने तिसरे स्थान मिळवून प्लेऑफ गाठले, जिथे त्यांना साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहिलेल्या मुंबईने पराभूत केले. मात्र, या संपूर्ण सीझनमध्ये लखनौचा संघ खूप चर्चेत राहिला. हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला असला तरी त्यांच्या खेळावर बरीच टीकाही झाली होती. बालिश चुकांमुळे लखनौने एलिमिनेटर सामना गमावला.

या सामन्यात लखनौने एक-दोन नव्हे तर अशा अनेक चुका केल्या, ज्या अगदी बालिश होत्या. कामगिरी व्यतिरिक्त, लखनौ या हंगामात देखील वादांनी भरले होते. या महिन्याच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी संघाचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात भर मैदानात वाद पाहायला मिळाला. यानंतरही दोघेही शांत झाले नाहीत आणि नंतर सोशल मीडियावरही शीतयुद्ध सुरूच होते. त्यामुळे लखनौच्या प्रतिष्ठेलाही मोठा फटका बसला. अशा स्थितीत संजीव गोयंका यांच्यासोबतच्या संभाषणाच्या फोटोवरून असे बोलले जात आहे की, हा गंभीरचा लखनऊसोबतचा शेवटचा सीझन होता.

सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून विविध कमेंट्स यावर पाहता येत आहेत. गौतम गंभीरवर लखनौचा संघ सोडून जाण्याची वेळ येणार की नाही, यावर सध्या चर्चा सुरु आहे. विराट कोहलीच्या वादानंतर गौतम गंभीर चर्चेचा विषय होता. पुढील सामन्यांमध्ये सुद्धा त्या वादाचा फटका गंभीर आणि नवीन उल हकसहित त्यांच्या संघाला बसला.

2023-05-25T06:04:15Z dg43tfdfdgfd