रोहित शर्माचा वारसदार ठरला; हिटमॅननंतर हा खेळाडू होणार वनडेचा कॅप्टन!
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मलिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली. यामध्ये बीसीसीआयने मोठे बदल न करता संघ जाहीर केलाय. पण काही महत्त्वाचे निर्णय बीसीसीआयने घेतले आहे. टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीची एन्ट्री झाली आहे. तर मोहम्मद सिराज याला डच्चू देण्यात आला आहे. तसेच करुण नायरला देखील संघात स्थान दिलं गेलं नाही. एकीकडे रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कायम असतानाच आता शुभमन गिल याच्याकडं उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन्सी दिल्याने आता रोहित शर्मानंतर शुभमन गिल टीम इंडियाची जबाबदारी सांभाळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. बीसीसीआयने याचे स्पष्ट संकेत दिलेत. शुभमनला व्हाईस कॅप्टन्सी दिल्यानंतर बीसीसीआय त्याचा भविष्यातील कर्णधार म्हणून गांभीर्याने विचार करत असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. तर हार्दिक पांड्याचा पत्ता कट झालाय. दरम्यान, मागील वर्षी म्हणजेच जुलै 2024 मध्ये शुभमन गिल उपकर्णधार असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता शुभमन गिलवर थेट जबाबदारी सोपवल्याचं पहायला मिळतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
2025-01-18T12:01:39Z