भारतीय कॅप्टनशी मैदानातच भिडले तीन क्रिकेटर, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली : भारताचा १९ वर्षांखीलल वर्ल्ड कपमध्ये सामना सुरु आहे तो बांगलादेशबरोबर. पण या सामन्यात एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाले. कारण हा सामना सुरु असताना भारताचा कर्णधार उदय सरहानवर बांगलादेशचे तीन खेळाडू भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मैदानात नेमकं घडलं तरी काय होतंं, याचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही गोष्ट घडली ती २५ व्या षटकात. भारतीय संघाची तेव्हा फलंदाजी सुरु होती आणि कर्णधार उदय हा स्ट्राइकवर होता. बांगलादेशचा अरिफूल इस्लाम यावेळी गोलंदाजी करत होता. या २५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या दुसऱ्या चेंडूवर उदयने एकेरी धाव घेतली. पण त्यावेळी अरिफूलला नेमकं काय झालं माहिती नाही, त्याने उदयला अपशब्द वापरायला सुरुवात केली. तो उदयला अपशब्द का वापरत होता, याचे कारण अद्याप समजले नाही. पण हा दुसरा चेंडू झाल्यावर अरिफूल उदयला अपशब्द वापरत असल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी उदयचाही पारा चढला. कारण मैदानात अपशब्द ऐकायला आल्यावर त्याचाही पारा चढला. त्यामुळे यावेळी उदय अरिफूलच्या दिशेने गेल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. उदय अरिफूलच्या अंगावरच यावेळी गेला होता. पण मैदानातील पंचांनी तिथे मध्यस्थी केली आणि उदयला बाजूला सारले. त्यानंतर बांगलादेशचा रॅबी हा उदयशी काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पंच उदयशी संवाद साधत असताना बांगलादेशचा रिझवान उदयशी वाद घालायला आला. तेव्हा पंचांनी त्याला दूर लोटले. अरिफूलने उदयला अपशब्द का वापरले, हे अद्याप समजू शकले नाही. पण त्यावेळी उदय हा चांगल्या फॉर्मात होता आणि धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्यामुळे आपल्याला विकेट मिळत नसल्याचा राग यावेळी अरिफूलने उदयवर काढल्याचे यावेळी म्हटले जात आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला आहे. आता या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-01-20T14:48:02Z dg43tfdfdgfd