रोहितच्या भांडणाला द्रविड यांचा विरोध, विजयानंतर नेमकं असं घडलं तरी काय जाणून घ्या...

बंगळुरु : भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला खरा, पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. कारण रोहित शर्माच्या भांडणाला आता द्रविड यांनी विरोध दर्शवला आहे. विजयानंतर नेमकं भारतीय संघाच चाललंय तरी काय, हे आता समोर आले आहे.

नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर अफगाणिस्तानचे खेळाडू चोरटी धाव घेत होते. त्यावेळी चेंडू भारताचा यष्टीरक्षक संजू समॅमसनकडे होता. संजूने तो चेंडू गोलंदाजाकडे देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा चेंडू अफगाणिस्तानच्या फलंदाजाच्या पायाला लागला आणि तो लांब गेला. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला दोन धावा अतिरीक्त मिळाल्या. त्यावेळी रोहित शर्मा हा चांगलाच भडकला होता. रोहित यावेली पंचांशी आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूशी भांडत होता. या अतिरीक्त धावा अफगाणिस्तानला देऊ नये, असे रोहित यावेळी सांगत होते. पण त्यावेळी पंचांनी रोहितचे ऐकले नाही आणि त्यांनी अफगाणिस्तानला त्या अतिरीक्त धावा दिल्या.

राहुल द्रविड यांचा विरोध नेमका कशाला आहे, जाणून घ्या...तिसरा टी-२० सामना संपल्यावर द्रविड यांनी एक खास मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी द्रविड म्हणाले की, " नियाप्रमाणे अफगाणिस्तानला या धावा द्यायला हव्यात. तुम्ही जेव्हा मैदानात असता तेव्हा तुम्ही आक्रमक होऊ शकता. पण या गोष्टीचा शांतपणे विचार केली की, नियमाप्रमामे अफगाणिस्तानला या अतिरीक्त धावा द्यायला हव्यात. या मालिकेच्या पहिल्या सामन्यात अशीच एक गोष्ट घडली. त्यावेळी भारतीय फलंदाजाच्या बॅटला लागून चेंडू गेला होता. त्यावेळी आम्ही धावा घेतल्या होत्या. त्यामुळे जर आम्ही अशा धावा घेत असून तर त्या अफगाणिस्तानला का द्यायला नकोत. नियम हे सर्वांनाच सारखे आहेत."

आयसीसीने क्रिकेटचे काही नियम बनवले आहेत आणि ते सर्वांसाठी सारखेच असतात. त्यामुळे जर भारताने अशा धावा घेतल्या असतील तर त्याला अफगाणिस्तानलाही मिळायला हव्यात, असे द्रविड यांचे मत आहे. त्यामुळे द्रविड यांनी यावेळी रोहित शर्माने जे मैदानात भांडण केले त्यालाही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे.

2024-01-18T13:44:53Z dg43tfdfdgfd