नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचणार की नाही, हे आता पावसावर अवलंबून असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे. पण या आशेवर पाणी फिरवू शकतो तो पाऊस.
सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये बुधवारी सामना होणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. पण हैदराबादच्या या सामन्यात पाऊस पडू शकतो, असे म्हटले जात आहे. या पावसाचा एकाप्रकारे लखनौ आणि हैदराबाद या दोन्ही संघांना फायदा होऊ शकतो. पण या सामन्यात जर पाऊस पडला तर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा मावळू शकतात, असे आता समोर येत आहे.
हैदराबाद आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ प्रत्येकी ११ सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत. त्यामुळे जर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामन्याच पाऊस पडला आणि हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. त्यामुळे हैदराबाद आणि लखनौ या दोन्ही संघांचे १३ गुण होती आणि ते तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर जातील. त्यामुळे यापुढे मुंबईने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १२ गुणच होतील आणि १३ गुणांपर्यंत त्यांना पोहोचता येणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे भवितव्य हे पावसावर अवलंबून असणार आहे.
हैदराबाद आणि लखनौ यांच्या सामन्यात ६०-७० टक्के पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-05-08T13:14:02Z dg43tfdfdgfd