मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन प्रशिक्षक निवडण्याच्या प्रक्रियेस वेग आला आहे. बीसीसीआयने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यातून अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला आहे. जाहीरातीमध्ये भारताच्या प्रशिक्षकपदासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर या पदासाठी अर्ज कधीपर्यंत भरू शकतो, याती तारखही त्यांनी सांगितली आहे.
कमीत कमी दोन वर्ष कोणत्या तरी देशाच्या कसोटी सामन्याचे मुख्य प्रशिक्षक असावा.
कोणत्याही सहयोगी संघाचे किंवा आयपीएलमधील संघाचे तसेच इतर लीगमधील संघाचे किंवा कोणत्या देशातील अ संघाचा तीन वर्ष प्रशिक्षक असावा.
बीसीसीआयच्या कोचिंगचे लेवल-३ चे प्रमाणपत्र असायला हवे.
वय ६० वर्षाहून कमी असावे.
गेल्यावर्षी, बीसीसीआयने प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन प्रशिक्षकाची निवड प्रकिया सुरु केली होती. पुढच्या मोठ्या स्पर्धेचा कारभार सांभाळण्यासाठी खूप कमी वेळ असल्यामुळे राहुल द्रविडला जून महिन्यातील विश्वचषक स्पर्धेपर्यंत पदभार सांभाळण्यासाठी मनवण्यात आले होते. आता टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघ रवाना होण्याआधीच अर्ज मागण्यात आले आहेत. जर द्रविडला पुन्हा प्रशिक्षक बनायचे असेल तर त्यांना अर्ज भरावा लागेल.
राहुल द्रविडने भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी डिसेंबर २०२१ पासून संभाळली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सेमी-फायनल पर्यंत पोहचला होता. तसेच २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिप व एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचली होती.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-05-14T15:53:41Z dg43tfdfdgfd