IND VS ENG 5TH TEST DAY 2 : भारताने रचला विजयाचा पाया, रोहित व गिल यांच्या शतकासह धावांचा डोंगर

धरमशाला : पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतीय संघाने आता विजयाचा पाया रचल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी झंझााती शतकं झळकावली आणि त्यामुळे भारतीय संघाला धावांचा डोंगर रचता आला. पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक्कल आणि सर्फराझ खान यांनीही यावेळी अर्धशतकं पूर्ण केली आणि संघाच्या धावसंख्येत मोलाचा हातभारत लावला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवस अखेर भारताची ८ बाद ४७३ अशी धावसंख्या असून त्यांच्याकडे २५५ धावांची दमदार आघाडी आहे.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी या दुसऱ्या दिवसाची धमाकेदार सुरुवात भारताला करून दिली. रोहित आणि गिल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीला पूर्णपणे निष्प्रभ केले आणि त्यानंतर त्यावर जोरदाडर प्रहारही केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ हा बॅकफूटवर ढकलला गेला. रोहित आणि गिल या दोघांनीही यावेळी शतकं झळकावली. त्यामुळे हे दोघे आता मोठी खेळी साकारणार, असे वाटायला लागले होते. पण त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक चाल खेळली आणि भारताला मोठा धक्का दिला.

बेन स्टोक्स यावेळी स्वत: गोलंदाजीला आला. स्टोक्सने यावेळी आपल्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले आणि इंग्लंडला मोठे यश मिळवू दिले. रोहितने यावेळी १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर १०३ धावांची दमदार खेळी साकारली. रोहितनंतर सामन्याची सर्व जबाबदारी ही गिलच्या खांद्यावर होती. गिलने शतक झळकावले, पण त्यानंतर गिलदेखील जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. जेम्स अँडसरसनने यावेळी गिलला बाद करत भारताला अजून एक धक्का दिला. गिलने १२ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ११० धावांची खेळी साकारली. रोहित आणि गिल हे सेट झालेले फलंदाज एकामागून एक बाद झाले आणि भारतावर दडपण वाढले होते.

रोहित आणि गिल बाद झाले असले तरी पदार्पण करणारा देवदत्त आणि सर्फराझ यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. देवदत्तने पदार्पणाच्या सामन्यातच यावेळी अर्धशतक पूर्ण केले. देवदत्तने १० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. सर्फराझची त्याला चांगली साथ मिळाली. सर्फराझने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल हे दोघेही १५ धावांवर बाद झाले. पण भारताचा डाव तळाच्या फलंदाजांनी रोखून धरला होता. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमरा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच प्रतिकार केला.

भारताने दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारला असून त्यांनी विजयाच्या दिशेने ठोस पाऊल टाकल्याचे समोर आले आहे.

2024-03-08T11:29:01Z dg43tfdfdgfd