IND VS ENG: तो ओरडून ओरडून सांगत होता; रोहित शर्माने ऐकले नाही, रिप्ले पाहिल्यानंतर डोक्याला हात लावायची वेळ आली

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवी आणि अखेरची कसोटी धरमशाला येथे सुरू झाली आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिल्या डावात २१८ धावांवर ऑलआउट झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडची दाणादाण उडाली. कुलदीप यादवने सर्वाधिक ५ तर आर अश्विनने ४ विकेट घेतल्या.

पाचव्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय किती चुकीचा होता हे लक्षात येण्यासाठी फार वेळ लागला नाही. पहिल्या सत्रात इंग्लंडने १०० धावांत २ विकेट गमावल्या होत्या. लंच ब्रेक झाला तेव्हा अनुभवी फलंदाज मैदानावर होता. रुटने काही चेंडूच खेळले होते. अशाच २६व्या ओव्हरमध्ये जलद गोलंदाज जसप्रती बुमराहचा पहिला चेंडू रुटच्या लेग साइडला बॅटला स्पर्श करून विकेटकिपर ध्रुव झुरेलकडे गेला. पण त्याला तो चेंडू पकडता आला नाही. तेव्हा लेग स्लिपमध्ये उभा असलेला सर्फराज खानने ड्राइव्ह मारून चेंडू खाली पडण्याआधी पकडला.

scorecard

सर्फराजला कल्पना होती की चेंडूने रुटच्या बॅटचा हलकासा स्पर्श केला आहे. त्याने अपील देखील केली पण अंपयारने ती फेटाळून लावली. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने ध्रुवकडे विचारणा केली की, चेंडूने बॅटचा स्पर्श केला आहे का? यावर ध्रुवने नकार दिला. अशाच सर्फराजने रोहितला DRS घेण्यास सांगितले. त्याने रोहितला पटवून देण्याचा प्रयत्न केला की चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला आहे. मात्र कर्णधार रोहित शर्माला हे काही पटले नाही आणि रिव्ह्यू घेण्याची वेळ निघून गेली.

थोड्यावेळाने जेव्हा मैदानावरील स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला त्यात रुटच्या बॅटने चेंडूला स्पर्श केल्याचे दिसले. हा रिल्पे पाहिल्यावर रोहितला आपला निर्णय चुकल्याची जाणीव झाली. जर सर्फराजचे ऐकले असते तर भारताला रुटची विकेट मिळाली असते. कारण गेल्या कसोटीत रांचीत रुटने शतकी खेळी केली होती. अर्थात याचा या जीवनदानाचा रुटला फार फायदा घेता आला नाही. २६ धावांवर रविंद्र जडेजाने त्याला माघारी पाठवले.

2024-03-07T10:11:17Z dg43tfdfdgfd