लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला प्रश्न विचारण्यात आला की लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध चांगल्या स्थितीत असतानाही संघाला सामना का करावा लागला, तेव्हा त्याने यास मयंक यादवच्या गोलंदाजीला जबाबदार ठरवलं. शिखर धवन म्हणाला की, मयंक यादवने तुफान गोलंदाजीच्या जोरावर आमच्या हातातून सामना हिसकावून घेतला. त्याने पदार्पणातच ताशी १५६किमी वेगाने गोलंदाजी करुन सर्वांना आश्चर्यचकित केलं. मयंक एक उत्तम यॉर्कर गोलंदाज आहे. याचा प्रत्यय या सामन्यात आला.
मयंकच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने गेल्या वर्षीच्या २३ वर्षांखालील कर्नल सीके नायडूच्या सहा सामन्यात १५ विकेट घेऊन दिल्लीसाठी खळबळ उडवून दिली होती, याशिवाय त्याने बॅटने ६६ धावांचे योगदान दिले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३-२४ च्या चार सामन्यात पाच बळी घेतले. २०२३ देवधर ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून खेळताना त्याने पाच सामन्यांमध्ये १७.५८च्या सरासरीने १२ बळी घेतले.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-03-31T04:10:21Z dg43tfdfdgfd