आम्ही हरलो पण... पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिकचे मोठे वक्तव्य

गुजरातने मुंबई संघाचा पहिल्याच सामन्यात मुंबईचा ६ धावांनी पराभव केला आणि या विजयाने हंगामाची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करतांना गुजरात टायटन्स संघाने २० षटकांत ६ गडी गमावत १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १६२ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून १० धावा केल्या मात्र तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला.

पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला

“संघाने फलंदाजीची सुरुवात चांगली केली मात्र शेवट गोड झाला नाही. गुजरातच्या घरच्या मैदानावर हा सामना असल्यामुळे दोन्ही संघांना चांगला पाठिंबा मिळाला सामन्याला गर्दीही अलोट झालेली बघायला मिळाली. पण ही फक्त एक सुरूवात आहे स्पेधेत अजून १३ सामने शिल्लक आहेत आणि आम्ही नक्कीच पुनरागमन करू याची मला खात्री आहे”

मुंबई संघाला शेवटच्या ६ षटकांमध्ये ४८ धावांची गरज होती व ७ विकेट शिल्लक होत्या या समान्यात विजयाचा प्रमुख दावेदार म्हणून म्हणून मुंबई संघाकडे बघितले जात होते. मात्र यानंतर गुजरात टायटन्सने जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. मुंबई इंडियन्सकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने ४६ आणि रोहित शर्माने ४३ धावा केल्या. याशिवाय गुजरातकडून उमरझाई, स्पेंसन जॉन्सन, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

१३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माला साई सुदर्शनने LBW पायचीत केले. रोहितने २९ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. तिलक आणि ब्रेव्हिस यांनी २२ चेंडूत २२ धावा केल्या त्यानंतर टिळक आणि टीम डेव्हिडमध्ये १२ चेंडूत १३ धावांची भागीदारी झाली. मोहित शर्माने १६व्या षटकात ४ तर राशिद खानने १७व्या षटकात केवळ ३ धावा दिल्या.

2024-03-25T04:26:25Z dg43tfdfdgfd