एका घटनेमुळे आयुष्य बदलले..रिकव्हरीनंतर ऋषभ पंतने व्यक्त केली भावना

भारतीय संघातील तरुण खेळाडू ऋषभ पंत याचा २०२२ साली गंभीर स्वरूपाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याला जबर दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला अनेक महिने वेळ लागला.बीसीसीआयकडून आता पंतला खेळण्याची मंजुरी मिळाली आहे. नुकतेच त्याला आयपीएल २०२४ पूर्वी बीसीसीआयने ऋषभ पंतला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे. या स्पर्धेत पंत फलंदाजीसह विकेटकीपिंग करतांना दिसणार आहे. पंत लवकरच त्याची फ्रेंचायझी टीम दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होणार आहे. मात्र, त्याआधी पंतने वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आणि आपल्या रिकव्हरीबद्दल सांगितले. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया..

ऋषभ पंतशी खास बातचीतबीसीसीआयच्या घोषणेवर दिली प्रतिक्रियाअनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे.काही महिन्यांसाठी खेळातून बाहेर असणे खूप वेदनादायी आहे. भविष्यातील आव्हांसाठी तयार राहून जिद्द व मेहनतीने पुरागमन कारणे तितकेच गरजेचे आहे. असे, त्याने सांगितले

रिकव्हरीसाठी १४ महिन्यांचा हा प्रवास कसा होता?ऋषभ पंत - माझ्यासाठी ही केवळ शारीरिक लढाई नव्हती. मी सुरुवातीला आनंदी राहायचे असे. मी ठरवले की, आणि यामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळाली.उदासीन अवस्थेत मला आवडीचे काही खाण्याचीही इच्छा होत नव्हती. मात्र शारीरिक रिकव्हरी करण्यासाठी चांगले खाणे हे खूप महत्त्वाचे आहे हे माझ्या लक्षात आणि जेवणासोबतच व्यायामाकडे देखील मी लक्ष देऊ लागलो. यामुळे माझे वजन देखील नियंत्रणात असून चांगल्या पोषणामुळे दुखापतीतून लवकर रिकव्हर होण्यास मदत झाली.

कुटुंबाने बजावली महत्त्वाची भूमिकाऋषभ पंतने आपल्या रिकव्हरीचे संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबाला दिले. एकटेपणामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, या परिस्थित कुटुंबाचा आधार आवश्यक असतो. माझ्या रिकव्हरीतही कुटुंबाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

2024-03-13T08:12:04Z dg43tfdfdgfd