चेन्नईने एका धावात केला आरसीबीचा परफेक्ट कार्यक्रम, जाणून घ्या सामन्याचा टर्निंग पॉइंट

चेन्नई : फक्त एक धाव ही चेन्नई आणि आरसीबीच्या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण या फक्त एका धावेत चेन्नईच्या संघाने आरसीबीचा परफेक्ट कार्यक्रम केल्याचे पाहायला मिळाले. कारण ही एक धाव आरसीबीला चांगलीच महागात पडली.

आयपीएलच्या या पहिल्या सामन्याची धडाकेबाज सुरुवात आरसीबीचा कर्णधार आरसीबीचा कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसने केली. पहिल्या चार षटकांमध्ये फॅफने चेन्नईच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. पण फॅफला यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. कारण चेन्नईचा वेगवान गोलंदाज मिस्ताफिझूर रेहमानने यावेळी फॅफला बाद केले आणि आरसीबीच्या संघाला मोठा धक्का दिला. फॅफने यावेळी आठ चौकारांच्या जोरावर २४ चेंडूंमध्ये ३५ धावांची दमदार खेळी साकारली. त्यावेळी आरसीबीची धावसंख्या होती १ बाद ४१. पण त्यानंतर आरसीबीच्या संघाला याच षटकात अजून एक धक्का बसला.

मिस्ताफिझूरने आपल्या या पाचव्या षटकात फॅफनंतर रजत पाटीदारलाही बाद केले आणि आरसीबीला दुसरा धक्का दिला. रजत पाटीदारला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पुढच्याच म्हणजे सहाव्या षटकात आरसीबीच्या संघाला ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात अजून एक मोठा धक्का बसला. मॅक्सवेलही यावेळी शून्यावर बाद झाला. त्यावेळी आरसीबीची धावसंख्या झाली होती ३ बाद ४२. त्यामुळे या फक्त एका धावेत चेन्नईच्या संघाने आरसीबीच्या तीन फलंदाजांना बाद केले आणि तिथेच हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर विराट कोहलीवरही दडपण आले आणि तो २१ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर एका युवा खेळाडूने आरसीबीचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले.

आरसीबीच्या अनुज रावतने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये धमाकेदार फटकेबाजी केली. अनुजने यावेळी तुफानी फलंदाजी केली आणि त्यामुळे आरसीबीचा डाव सावरला गेला. अनुजच्या या खेळीच्या जोरावर आरसीबीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. त्यामुळे आरसीबीने सुरुवातीला विकेट्स गमावले असले तरी अखेरच्या षटकांमध्ये त्यांनी धावांची गती वाढवली आणि त्यामुळेच त्यांना चेन्नईच्या संघापुढे आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पण एका धावेमुळे आरसीबीचे धाबे चांगलेच दणाणले होते. अनुज रावतने यावेळी २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४८ धावांची भन्नाट खेळी साकारली. रावतला यावेळी दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली. कार्तिकने २६ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ३८ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीच्या संघाला या सामन्यात २० षटकांत ६ बाद १७३ अशी मदल मारता आली.

आरसीबीने यावेळी सुरुवातीच्या पडझडीनंतर सन्मानजनक धावसंख्ये उभारली. त्यामुळे या सामन्याची रंगत अधिकच वाढली.

2024-03-22T16:35:37Z dg43tfdfdgfd