धरमशाला : भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडवर एका डावाने विजय साकारला. भारताचा हा मोठा विजय ठरला. पण या सामन्यात एकच गोष्ट अशी घडली की, त्यामुळे संपूर्ण सामन्याला कलाटणी मिळाली. य सामन्यातील एक गोष्ट भराताच्या विजयासाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले.
भारताने तिसऱ्या दिवशीच या सामन्यात विजय साकारला. या तिन्ही दिवशी भारताचेच या कसोटी सामन्यावर वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. कसोटीचा पहिला दिवस भारताच्या फिरकीपटूंनी गाजवला. कुललदीप यादवने पाच तर अश्विनने तीन बळी मिळवले. त्यामुळे सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताला इंग्लंडला ऑल आऊट करता आले. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने दमदार फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी या दिवशी शतकं झळकावली. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताला २५५ धावांची आघाडी घेता आली होती. सामन्याचा तिसरा दिवस अश्विन आणि अन्य गोलंदाजांनी गाजवला आणि भारताला विजय मिळवता आला. पण या तीन दिवसांत एक अशी कोणती गोष्ट घडली, ज्यामुळे भारताला विजय मिळवता आला.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा टर्निंग पॉइंट घडल्याचे पाहायला मिळाले. सामन्याचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. कारण या दिवशी जो सरस कामगिरी करेल तो सामना जिंकू शकत होता. या दिवशी भारताच्या बाजून एक गोष्ट सर्वात चांगली घडल्याचे पाहायला मिळाले. या दिवसाची दमदार सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १७१ धावांची दमदार भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताला विजयाचा पाया रचता आला. रोहित आणि गिल या दोघांनाही यावेळी शतके झळकावली. या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली आणि त्यामुळेच भारताला हा सामना जिंकता आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची ही भागीदारी भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहाला मिळाले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मोठा बदल हा फलंदाजीमुळे घडल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये रोहित आणि गिल यांची भागीदारी सर्वात महत्वाची ठरली.
2024-03-09T10:31:37Z dg43tfdfdgfd