मुंबई इंडियन्सने अखेर बदला घेतलाच, एका वाक्यात केला दिल्ली कॅपिटल्सचा गेम

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच आपला हिशोब चुकता करत असतो. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला कोणी डिवचलं तर त्याचा बदला ते नक्कीच घेत असतात. सध्या सोशल मीडियावर सुरु झालेलं आयपीएलचं वॉर हे मुंबई इंडियन्सने जिंकलं आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाने आता दिल्ली कॅपिटल्सचा व्याजासकट बदला घेतला आहे.

नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात २७ मार्चला आयपीएलचा सामना झाला होता. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. हैदराबादच्या संघाने तुफानी फटकेबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या यावेळी नोंदवली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली होती. मुंबईच्या संघाला हा सामना मगवावा लागला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे नाक कापले गेले होते. पण या पराभवाच्या जखमेवर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मीठ चोळले होते.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्यावेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगा बॅट उडवत होता आणि त्यानंतर त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. या व्हिडिओवर कोंबडी पळाली, हे गाणं लावलं होतं. या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादच्या फलंदाजांना विचारलं होतं की, तुम्ही आता सकाळी काय खाललं होतं. दिल्लीच्या संघाने यावेळी हैदराबादच्या संघाने नाव घेत मुंबई इंडियन्सला डिवचलं होतं. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याचा जोरदार बदला घेतल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सने कसा घेतला बदला, जाणून घ्या...

हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये शनिवारी सामना खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी दिल्लीच्या संघाची जोरदार धुलाई केली. हैदराबादच्या संघाने पावर प्लेच्या ६ षटकांत एकही विकेट न गमावता १२५ धावा केल्या. या फटकेबाजीच्या मदतीने हैदराबादने २६६ धावांचा डोंगर रचला. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला दिल्लीचा बदला घेण्याची सुवर्णसंधी मिळाली.

मुंबईच्या संघाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये कॉमेडियन अभिषेक उपमन्यूचा मीम शेअर करून “आ गया स्वाद ? म्हणत चांगलीच जिरवली आहे. दिल्लीच्या संघाला मुंबईच्या संघानो चोख उत्तर देत सोशल वॉर जिंकले आहे. पण आता त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे. त्यामुळे मुंबईचा संघ हा सामान जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबईच्या संघाला जर पराभव पत्करावा लागला, तर पुन्हा दिल्लीचा संघ त्यांच्यावर पलटवार करू शकतो. त्यामुळे सोमवारच्या सामन्यात मैदानात आणि मैदानाबाहरे नेमकं काय काय घडतं, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T11:32:51Z dg43tfdfdgfd