मुंबई इंडियन्सला विजयानंतर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर काय घडलं पाहा...

मुंबई : आरसीबीवर मुंबई इंडियन्सने धडाकेबाज विजय साकारला. पण या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. कारण या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

आरसीबीच्या संघाने १९६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हे आव्हान पूर्ण करेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण मुंबईच्या फलंदाजांनी याावेळी कमाल केली. कारण सुरुवातीपासूनच मुंबईने आरसीबीच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यामुळे आरसीबीचे हे आव्हान थिटे वाटायला लागले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाने दिमाखात हा सामना जिंकला हा सामना जिंकल्यावर मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाला जेव्हा सुरुवातीला तीन पराभव पत्करावे लागले होते. त्यावेळी ते गुणतालिकेत अखेरच्या म्हणजेच १० व्या स्थानावर होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिला विजय मिळवला. त्यामुळे मुंबईचा संघ आठव्या स्थानावर होता. पण मुंबईच्या संघाने सलग दुसरा विजय मिळवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने पंजाब किंग्सच्या संघाला पिछाडीवर ढकलले आहे. कारण यापूर्वी पंजाबचा संघ हा सातव्या स्थानावर होता. त्यामुळे या विजयानंतर आता मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचा संघ हा आता प्रत्येक सामन्यानंतर वरच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ आता यापुढे कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

तत्पूर्वी. पॉवरप्लेमध्ये फाफ डू प्लेसिसने अर्धशतक केले, तर डावाच्या मध्यास स्थैर्य देताना रजत पाटीदारने ५० धावांची खेळी केली. त्यानंतर दिनेश कार्तिकने मुंबई गोलंदाजांना विशेषतः आकाश मढवालला लक्ष्य केले. मढवालच्या दहा चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांसह ३३ धावा घेतल्या. हे तिघे अर्धशतकवीर सोडल्यास बेंगळुरूच्या एकाही फलंदाजास अर्धशतकी मजल मारता आली नाही. पण आरसीबीच्या संघाने हे मोठे आव्हान उभारले होते.

आंतरराष्ट्रीय टी-२० लढतीत भारतीय संघाचे नेतृत्त्व केलेल्या सुर्यकुमार यादवला मुंबई संघाने इम्पॅक्ट सब म्हणून खेळवण्याचे ठरवले. पियुष चावलास वगळून श्रेयस गोपालला निवडण्यात आले. त्याचवेळी पुनरागमनाच्या सामन्यात भोपळाही न फोडलेल्या सुर्यकुमारला इम्पॅक्ट सब खेळवण्याचे ठरवले. प्रथम गोलंदाजी असल्यामुळे आकाश मढवालची निवड करण्यात आली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T06:57:50Z dg43tfdfdgfd