मुंबईच्या मानहानीकारक पराभवानंतर सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला स्पष्टच सांगतो की...

हैदराबाद : मुंबई इंडियन्सला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर चाहते मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रोल करत आहे. या पराभवानंतर आता महान क्रिकेटपटू आणि संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने एक मोठे वक्तव्य केले आहे. सचिनचा हा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

सनरायझर्स हैदराबादने ३ बाद २७७ अशी बलाढ्य धावसंख्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याच रचली. आतापर्यंतच्या १७ वर्षांतील आयपीएलमधील ही सर्वाधिक धावसंख्या असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली. मुंबई इंडियन्सच्या एकाही गोलंदाजाला यावेळी अचूक मारा करत हैदराबादच्या धावगतीला खीळ बसवता आली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

सचिनने या सामन्यानंतर सांगितले की, " हैदराबादच्या संघाने २७७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आपण १० षटके खेळलो आणि त्यावेळी हा सामान कोणता संघ जिंकू शकेल, हे सांगता येत नव्हते. कारण त्यावेळी कोणताही संघ हा सामना जिंकू शकत होता, असे चित्र होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ हे लक्ष्य साध्य करू शकतो, असे वाटत होते. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली होती. पण त्यानंतर मी तुम्हाला क्लीअर कट सांगतो की, आपण चांगली फलंदाजी केली आणि हे चांगले उदाहरण आहे. यापुढेही कठीण क्षण आपल्या आयुष्यात येऊ शकतात, पण जर आपण एकजुट दाखवली तर ही गोष्ट सहजपणे आपण पेलवू शकतो. त्यामुळे आपल्यातील एकी महत्वाची आहे. आपण जर एकत्र राहू शकलो तर या कठीण प्रसंगामधून आपण सहजपणे बाहेर पटू शकतो, असे मला वाटते."

हैदराबादच्या संघाने सर्वाधिक धावा उभारल्या असल्या तरी मुंबईच्या संघाने मात्र चांगली लढत दिली. त्यामुळेच हा सामना नीरसवाणा झाला नाही. मुंबईच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली असली तरी त्यांना विजय मिळवता आला नाही. पण पहिल्या १० षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी धमाकेदार फटकेबाजी करत हा सामना रंगतदार अवस्थेत ठेवला होता.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T11:49:00Z dg43tfdfdgfd