यशस्वी जयस्वालने पटकावला जगातील मानाचा पुरस्कार, क्रिकेट विश्वात ठरला अव्वल...

नवी दिल्ली : यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण यशस्वीने आता आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वातील तो अव्वल खेळाडू ठरला आहे.

भारताने फेब्रुवारीमध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडवर मालिका विजय मिळवण्यासाठी दमदार संघर्ष केला. यामध्ये यशस्वीची भूमिका भारतासाठी महत्वाची ठरली. कारण फेब्रुवारी महिन्यात यशस्वीने तीन कसोटीमध्ये ११२ च्या सरासरीने ५६० धावा केल्या, अशी कामगिरी क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेली नाही. 22 वर्षीय यशस्वीने महिन्याची सुरुवात विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत सुरेख द्विशतकाने केली, जिथे यशस्वीने पहिल्या डावात शानदार 209 धावा ठोकल्या आणि भारतीय संघाने १०६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली. पण यशस्वी फक्त तेवढ्यावरच थांबला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये झाला. या सामन्यातही यशस्वीचा फॉर्म कायम असल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीने राजकोट येथील कसोटी सामन्यातही अर्धशतक झळकावले. यशस्वीने यावेळी २१ ४ धावांची स्फोटक फटकेबाजी केली. या सामन्यातील एका डावा यशस्वीने सर्वाधिक षटकारांच्या विश्वविक्रमाशीही बरोबरी केली. यशस्वीच्या या दुहेरी शतकाच्या जोरावर भारताने विजय साकारला. त्यानंतर चौथ्या कसोटीत यशस्वीने अर्धशतक पूर्ण केले आणि आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या १० खेळाडूंमध्ये पोहोचला.

यशस्वी जैस्वाल म्हणाला की, " हा ICC चा पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि मला आशा आहे की भविष्यात आणखीन बरेच काही मला मिळत राहील. ही माझी पहिली पाच कसोटी सामन्यांची मालिका होती आणि माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांबरोबरचा हा एक अविश्वसनीय अनुभव होता. मी माझ्या सराव सत्रांमध्ये कठीण गोष्टी करणे सुरूच ठेवले आहे. माझ्या वरिष्ठांकडून मी शिकत आहे आणि मैदानात दमदार कामगिरी करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न मी करत आहे. राजकोटमध्ये द्विशतक साजरे करणे हे माझ्यासाठी खास होते. या खेळीने मला सर्वोच्च आनंद मिळाला होता."

यापूर्वी भारताच्या शुभमन गिलने सप्टेंबर २०२३ मध्ये आयसीसीचा हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर हा पुरस्कार पटकावणारा यश्सवी हा दुसरा खेळाडू ठरला आहे.

2024-03-12T09:54:28Z dg43tfdfdgfd