रोहित शर्माने निवृत्तीबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला ...मी क्रिकेपासून दूर जाईन कारण...

धरमशाला : रोहित शर्माच्या सध्या घडीला चांगल्या फॉर्मात असला तरी त्याने आता निवृत्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण कधी बाहेर पडणार, याबाबत रोहितने आता एक सूचक वक्तव्य केले आहे.

यशाच्या शिखरावर असताना खेळाडू काही वेळा निवृत्तीची घोषणा करतात, कारण त्यामुळे त्यांचा सन्मान जास्त राखला जातो असे म्हटले जाते. रोहित सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. रोहितने पाचव्या कसोटीत दमदार शतक झळकावलं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला ४-१ अशी धुळ चारली आणि मालिका खिशात टाकली. त्यामुळे रोहितसाठी सर्व काही आलबेल सुरु आहे. पण तरीही रोहित शर्माने हे मोठे वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पण रोहित असं का म्हणाला, याचे कारणही त्याने सांगितलं आहे.

यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, " जर मला एके दिवशी वाटले की, मी पुरेसे चांगले क्रिकेट खेळू शकत नाही किंवा मी माझ्या गुणवत्तेला न्याय देऊ शकत नाही, तर मी क्रिकेट खेळणे सोडून देईन. पण गेल्या २-३ वर्षांत माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे मला वाटते." सामना संपल्यावर रोहित शर्माची एक खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानही होता. यावेळी रोहितने स्पष्ट केले की, आपण क्रिकेट कधी सोडू शकतो. त्याचबरोबर रोहितने यावेळी आपल्या निवृत्तीचे कारणही सांगितले आहे. जर आपल्याला पुरेसे चांगले क्रिकेट खेळता येत नसेल तर आपण क्रिकेट सोडून देणार असल्याचेही रोहितने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर रोहितकडून चांगले क्रिकेट खेळले जात नसेल तर तर तो निवृत्ती घेईल.

रोहित शर्माकडून यावर्षी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असले तरी त्याच्याकडे भारताचे नेतृत्व कायम आहे. त्याचबरोबर टी-२० वर्ल्ड कपमध्येही रोहित भारताचे नेतृत्व करणार असल्याचे सुतोवाच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केले आहे. त्यामुळे हा टी-२० वर्ल्ड कप रोहित शर्माच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरेल.

2024-03-09T12:31:54Z dg43tfdfdgfd