विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

मुंबई : विराट कोहलीला आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा सामान सुरु असताना प्रेक्षकांसमोर चक्क कान पकडावे लागले. कोहलीकडून यावेळी कोणती मोठी चूक झाली की त्याने काही अशोभनीय कृत्य केलं हे सुरुवातीला कोणालाही समजत नव्हतं. पण अखेर कोहलीने सामना सुरु असताना सर्वांसमोर आपले कान का धरले, हे आता समोर आले आहे.

कोहलीने आयपीएल २०२४ च्या हंगामात मध्ये ६ सामन्यात ३१६ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गुरुवारी मात्र आरसीबीच्या महान फलंदाजाला बुमराहच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करावा लागला आणि तो नऊ चेंडूत केवळ ३ धावांवर बाद झाला. या सामन्यात पाच विकेट्स घेणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कोहलीला मात्र ३ धावांवर बाद केले.

विराट स्ट्रॅटेजिक टाईम आऊटदरम्यान मैदानात संघाबरोबर होता. त्यावेळी यापुढे सामन्यात काय करायचं याची रणनिती आरसीबीचा संघ ठरवत होता. त्यावेळी कोहलीला गोलंदाजी करायला द्या, असा हट्ट चाहत्यांनी केला. मात्र, कोहलीने या घोषणांना विनोदी प्रतिसाद दिला आणि ही मागणी लगेच फेटाळून लावली. आरसीबीच्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहून चाहत्यांनी ही मागणी केली होती. चाहत्यांच्या या हट्टापुढे किंग कोहलीने कान पकडून मी बुमराहची बरोबरी करू शकत नाही अशी चाहत्यांना प्रतिक्रिया केली होती. या सामन्यात विराट कोहलीचा मनोरंजक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला.

आरसीबी विरूद्ध मुंबईच्या सामन्यात आरसीबीला गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करताना आव्हानांचा सामना करावा लागत असताना प्रेक्षकांमधून एकच नारा उमटला 'कोहली को बॉलिंग दो!’. ह्या आग्रहावर विराटने मजेशीर प्रतिक्रिया केली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी भारताच्या २०२३ विश्वचषकाच्या सामन्यांच्या वेळी हा जप नियमितपणे वापरण्यात आला होता. विशेष म्हणजे कोहलीने नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषकातील साखळी फेरीतील एका सामन्यात गोलंदाजी केली होती आणि एक विकेटही घेतली होती. त्या दरम्यान चाहत्यांना विराटची गोलंदाजी फारच आवडली होती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून सात विकेट राखून पराभव पत्करावा लागला. आरसीबी लाइनअपमधील हे आणखी एक खराब प्रदर्शन होते. रॉयल चॅलेंजर्सने फलंदाजीच्या जोरावर ८ बाद १९६ धावांपर्यंत मजल मारली, पण मुंबई संघाने आरसीबीची गोलंदाजी लाइनअप चार षटके शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली कामगिरी केली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज आरसीबीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत होते. त्यावेळी चाहत्यांनी विराट कोहलीला गोलंदाजी द्या, जेणकरून थोडे मनोरंजन होईल, असे म्हटले. कोहलीने यावेळी गोलंदााजी करण्यास नकार दिला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T10:12:48Z dg43tfdfdgfd