श्रेयस अय्यरचा आता नवीन वाद आला समोर, पहिल्या सामन्यापूर्वी काय घडलं ते जाणून घ्या...

कोलकाता : श्रेयस अय्यर आणि वाद हे आता एक समीकरण बनल्याचे समोर आले आहे. केकेआरचा संघ आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. पण श्रेयस अय्यरबाबत एक नवीन वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यापूर्वी नेमकं काय म्हणाला...

श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यापूर्वी म्हणाला की, " माझी दुखापत काय आहे आणि डॉक्टर नेमकं काय सांगतात, याचा विचार मी करत नाही. कारण जेव्हा तुम्ही दुखापतींचा जास्त विचार करता त्यावेळी तुम्ही चांगलं काय करू शकता, यापासून विचलित होता. त्यामुळे मला काय चांगलं करता येईल, यावर मी जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत बऱ्याच चुका झालेल्या आहेत. जेव्हा तुम्ही भूतकाळाकडे पाहता तेव्हा त्याच गोष्टी समोर येतात. मी या गोष्टींपासून बरेच काही शिकलो आहे. त्यामुळे तुमच्या हातामध्ये करण्यासारखं काय आहे, याचा तुम्ही विचार करायला हवा."

श्रेयस अय्यरकडे केकेआरचे कर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयस पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेलाही आला होता. त्यामुळे आता तो पहिल्या सामन्यात निश्चित खेळणार, असे सर्वांना वाटत असेल. पण ही गोष्ट दिसते तशी नक्कीच नाही आणि केकेआरच्या संघाच्या वक्तव्याने ही गोष्ट अजून चिघळली असल्याचे आता समोर आले आहे.

केकेआरच्या संघाने श्रेयस अय्यरबद्दल काय सांगितले पाहा...

श्रेयस अय्यरला यापूर्वी पाठिची दुखापत झाली होती. पण यामधून तो आता सावरला आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमधून सावरून फिट झाल्याचे संघाचा उप कर्णधार नितिष राणाने सांगितले होते. पण तरीही संघ त्याला खेळवण्यासाठी तयार नाही. कारण आतापर्यंत श्रेयसने दुखापतीबाबत बऱ्याच गोष्टी लपवल्या होत्या आणि सामना न खेळण्याचे कारण त्याने मिळवले होते, असे चाहते म्हणत होते. त्यामुळे श्रेयस एक सामना खेळेल आणि त्याला पुन्हा दुखापत झाली तर काय करायचे, हा प्रश्न केकेआरच्या संघापुढे आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला ते पहिला सामना खेळवण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे.

श्रेयसबाबत आता कोणता वाद सुरु झाला आहे, जाणून घ्या...

काही दिवसांपासून दुखापतींच्या मुद्दयांवर आपली अपप्रसिद्धी झाली, असे श्रेयस अय्यरला वाटत आहे. त्यामुळे काहीही करून पहिला सामना खेळण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे त्याला संघ व्यवस्थापन पहिला सामना खेळायला देणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि केकेआरचे संघ व्यवस्थापन यामध्ये वाद असल्याचे म्हटले जात आहे. श्रेयसला खेळायचे असले तरी त्याला संघ खेळवण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे.

पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर खेळणार की नाही, याची उत्सुकता आता सर्वांना आहे. त्यामुळे जेव्हा केकेआरच्या सामन्याचा टॉस होईल तेव्हा खरी गोष्ट काय ते समोर येऊ शकते.

2024-03-23T08:22:11Z dg43tfdfdgfd