सामन्यानंतर पंतची संतप्त प्रतिक्रिया, सलग पराभवाचे सहकारी खेळाडूंवर फोडले खापर

दिल्लीचा कर्मधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसरा पराभव झाला आहे. या निराशाजनक पराभवानंतर संघाचा कर्णधार ऋषभ पंत खूपच निराश दिसला आणि त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाची नेमकी चूक कुठे झाली ते सांगितले.

सामन्यानंतर काय बोलला ऋषभ..

सामना संपल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला, 'नक्कीच मी या पराभवाने निराश झालो आहे, पण आता या पराभवातून निश्चितच आम्हाला शिकवण मिळाली आहे. सामन्यातील १५-१५ षटके गोलंदाजांनी संघाच्या फलंदाजावर चांगले नियंत्रण मिळवले होते. मात्र त्यानंतर संघाच्या हातून सामना निसटला व संघाला पुनरागमाची संधी मिळाली नाही.

डेथ ओव्हर्समध्ये चूक..

पंत म्हणाला, 'अनेकदा असे घडते की संथ सुरुवात केल्यानंतर फलंदाज डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करतात. आजच्या सामन्यातही तेच झाले. शेवटच्या षटकांमधील रायच्या गोलंदाजीमुळे सामना आमच्या हताबाहेर गेला.

नॉर्खिया देखील जबाबदार

एनरिक नॉर्खियाने दिल्ली कॅपिटल्ससाठी डावातील शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने २५ धावा दिल्या. नॉर्खियाच्या या षटकावर पंत म्हणाला, 'आम्हाला इच्छा होती की नॉर्खियाने आमच्यासाठी डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करावी पण

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऋषभ पंतने राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. रियान परागच्या दमदार फलंदाजीमुळे राजस्थान संघाने १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला २० षटकांत केवळ १७३ धावा करता आल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-29T03:20:32Z dg43tfdfdgfd