हार्दिक पंड्याची चिंता वाढली, मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्यापूर्वीच बसला मोठा धक्का

हैदराबाद : दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच आता हार्दिक पंड्याची चिंता वाढलेली आहे. मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना हा सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्यात सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. हा सामना सुरू झाल्यापासून चाहत्यांनी हार्दिक पंड्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. हार्दिक पंड्या अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी करत होता. पण हार्दिक जेव्हा संघाला गरज होती तेव्हाच बाद झाला आणि मुंबई इंडियन्सला सामना गमवावा लागला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईने पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती खरी, पण फलंदाजीत त्यांना अपेक्षेसारखी कामगिरी करता आली नाही. मुंबईला पहिल्या तीन षटकांत दोन धक्के बसले होते. त्यानंतर रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत मुंबईच्या संघाला विजयाचा पाया रचून दिला होता. पण रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर मुंबईचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकता आला नाही. मुंबईला सध्या मधल्या फळीत एका दमदार खेळाडूची गरज आहे. सूर्यकुमार यादव हा दुसऱ्या सामन्यात खेळेल, असे सर्वांनाच वाटले होते. सूर्याच्या फिटनेसबाबत आता अपडेट्स आता आले आहेत. सूर्या आता दुसऱ्या सामन्यातही खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता आता हार्दिक पंड्याची चिंता वाढलेली असेल. कारण आता मधल्या फळीला बळकटी कशी आणायची, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर असणार आहे. त्यामुळे दुसरा सामनाही हार्दिक पंड्यासाठी सोपा नसेल, असे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना आता हैदराबादच्या संघाबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात तरी मुंबईचा संघ विजय मिळवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-27T07:46:21Z dg43tfdfdgfd