हार्दिक पंड्याने रोहित शर्माबाबत अखेर मौन सोडले, म्हणाला मला जर वाटलं तर मी त्याला...

मुंबई : हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सची सूत्रे सांभाळल्यावर सोमवारी अखेर त्याने रोहित शर्माबाबतचे मौन सोडले आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यावर हार्दिक रोहितबाबत एकही शब्द बोलला नव्हता. पण अखेर हार्दिकने रोहितबाबत मौन सोडत एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

हार्दिक आणि रोहितमध्ये बेबनाव का...

रोहित शर्माने आतापर्यंत मुंबई इंडियन्सला पाच जेतेपदं मिळवून दिली आहेत. पण मुंबई इंडियन्सने जेव्हा हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी विचारणा केली, तेव्हा पंड्याने संघाचे कर्णधारपद मागितले. पण त्यावेळी रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. पण पंड्याला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने ही पंड्याची गोष्ट मान्य केली. रोहित शर्माची कोणतीही चूक नसताना त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर रोहित आणि हार्दिक यांच्यात बेबनाव असल्याचे म्हटले जात होते.

आता हार्दिक रोहितबाबत नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...

मुंबई इंडियन्सची आज पत्राकर परिषद होती आणि त्यावेळी हार्दिक रोहितबाबत म्हणाला की, " मुंबई इंडियन्सने जे काही आयपीएलमध्ये मिळवले आहे ते रोहित शर्माकडे नेतृत्व असतानाच त्यांनी कमावले आहे. त्यामुळे नक्कीच रोहित शर्माचा टच या संघावर असेल. पण यापुढे आता रोहितने जे सुरु केलं होतं ते पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. रोहित शर्मा सध्याच्या घडीला भारतीय संघाचा कर्णधारही आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा मला चांगलाच फायदा होईल. या हंगामात रोहितचा हात माझ्यावर खांद्यावर असेल, हे मात्र नक्की. रोहित आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत, ही गोष्ट चुकीची आहे. मला गरज वाटली तर मी त्याला नक्कीच मार्गदर्शन करायला सांगेन. मला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी त्याच्याकडे नक्कीच मदत मागायला जाईन. मला जर वाटलं तर मी त्याला नक्कीच मैदानात काही गोष्ट करण्यासाठी सांगेन."

हार्दिक पंड्याला केलं जोरदर ट्रोल...

हार्दिक पंड्या कर्णधार झाला खरा, पण त्यानंतर त्याला चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले. रोहित शर्माच्या चाहत्यांनी तर हार्दिक जिथे दिसेल तिथे त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर तर हार्दिकला चाहत्यांनी चांगलेच सुनावले आणि ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले. पण हार्दिकने मात्र पत्रकार परिषदेमध्ये आमच्यात कोणतेही मदतभेद नसल्याचे म्हटले आहे. पण रोहित शर्मा मात्र याबाबत अजून काही बोललेला नाही. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर रोहित शर्मा नेमकं कधी आणि काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यातील नातं आता नेमकं कसं आहे, हे जेव्हा ते मैदानात उतरतील तेव्हाच सर्वांपुढे येणार आहे. त्याचबरोबर रोहित या सर्व प्रकरणावर कधी मौन सोडणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.

2024-03-18T10:40:20Z dg43tfdfdgfd