हार्दिकं पंड्याचं चाललंय काय, दुसऱ्यांदा केला बुमराहचा अपमान पण जस्सीने काय केलं पाहा...

नवी दिल्ली : हार्दिक पंड्याचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न आता चाहत्यांना पडायला लागला आहे. कारण हार्दिकने सलग दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहचा अपमान केला. पण बुमराहने माझ्यासारखा संघात दुसरा कोणीही नाही हे हार्दिकला दाखवून दिले.

हार्दिक पंड्याला जेव्हा मुंबई इंडियन्सने कर्णधार केले होते, त्यावेळी जसप्रीत बुमराहची एक पोस्ट व्हायरल झाली होती. बुमराह हार्दिकला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर नाराज असल्याचे त्याच्या सोशल पोस्टवरून पाहायला मिळत होते. त्यामुळे आता मैदानात हार्दिक पंड्या बुमराहवर असा राग काढत असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्या सामन्यातही हार्दिकने बुमराहचा अपमान केला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही हार्दिकने बुमराहचा अपमान केला. पण जस्सीने मात्र त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे.

हार्दिकने नेतृत्व सांभाळलं आणि बुमराहसाठी त्याने एक मोठा बदल संघात केला. मुंबई इंडियन्सकडून पहिले षटक टाकण्याचा मान यापूर्वी बरीच वर्षे बुमराहकडे होते. बुमराह हा मुंबईचा हुकमी गोलंदाज आहे. त्यामुळे रोहित शर्मा कर्णधार असताना तो नेहमीच बुमराहला पहिले षटक द्यायचा. पण आता मुंबई इंडियन्सचे नेतृत्व स्विकारल्यावर हार्दिकने हे समीकरण बदलून टाकले आहे. हार्दिकने गेल्या सामन्यात स्वत: पहिले षटक टाकले होते, तर दुसरे षटक ल्यूक वुडला दिले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने पहिले षटका संघात पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाला दिले. त्यानंतर दुसरे षटक स्वत: हून टाकले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही कोणत्याही टोकाकडून पहिले षटक यावेळी बुमराहला दिले नाही आणि त्याला त्याचा पहिले षटक टाकण्याचा मान दिला नाही. पण बुमराहदेखील महान गोलंदाज आहे. त्यामुळे बुमराहने हार्दिकला तोडीस तोड उत्तर दिल्याचे समोर आले आहे.

पहिल्या सामन्यात आपल्या पहिल्याच षटकात बुमराहने संघाला पहिली विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर या सामन्यात गोलंदाजीला आल्यावर बुमराहने एका षटकाच दोन विकेट्स मिळवले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात बुमराहने हार्दिकची बोलती बंद केली होती. पण यामधून हार्दिक काहीच शिकला नाही. दुसऱ्या सामन्यातही त्याने बुमराहला उशिरा गोलंदाजी दिली. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई हैदराबादच्या संघाने केली. पण या सर्वात कमी रनरेटने धावा देणारा गोलंदाज ठरला तो बुमराह. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांमध्ये अव्वल ठरल्याचे पुन्हा पाहायला मिळाले.

हार्दिक बुमराहला डावलून स्वत: गोलंदाजीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे, पण यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचेच जास्त नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T10:33:55Z dg43tfdfdgfd