हार्दिकचं बेताल वक्तव्य, लज्जास्पद कामगिरीनंतर ठोकली उलटी बोंब म्हणाला…

हैदराबादने प्रथम फलंदाजी करतांना मुंबईसमोर घावांचा डोंगर उभा केला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चाहत्यांना आशा होती की हार्दिक नेतृत्त्वात संघ पुनरागमन करेल पण हार्दिकचे सर्व फासे उलटे पडले आणि प्रत्येक गोलंदाजाला घसघशीत रन्स खर्च करावे लागले. या सामन्यात एका टी२० सामन्यात सर्वाधिक ३४ षटकार मारण्यात आले आहेत.

मला अपेक्षा नव्हती..

सनरायझर्स हैदराबादने बुधवारी मुंबईसमोर आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर २७७ रन्स केले. सामन्यानंतर हार्दिकला एकूण कामगिरीबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला, म्हणाला मला मुळीच अपेक्षा नव्हती की हैदराबादचे फलंदाज इतकी चांगली फलंदाजी करतील. पण त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करुन धावसंख्या उभारली. आयपीएल या टी२० स्पर्धेतली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव करत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपले खाते उघडले. सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना ३ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या, हा आयपीएलमधील नवा विक्रम आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध पाच गडी राखून २६३ धावांचा विक्रम हैदराबाद संघाने मोडीत काढला आहे.

वेळ बदलेल याचा विश्वास

हैदराबादने उभ्या केलेल्या लक्षापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या सामन्यात ५०० धावांपेक्षा अधिक धावा फलंदाजांनी केल्या. मैदानावरील विकेट ही फलंदाजांना फटकेबाजीसाठी मुख्य मदत करत होती. पण या सामन्यांमधील चुकांपासून आम्ही शिकलो आहे. येत्या काळात आमच्यासाठी गोष्टी पुन्हा सुरळीत होतीलअशी आम्हाला खात्री आहे. संघात तरुण गोलंदाज असल्यामुळे त्यांना अनुभव घेण्यासाठी वेळ लागेल. १७ वर्षीय गोलंदाज क्वेना म्फाकाने पदार्पणातच ६६ रन्स खर्च केले. पण आम्हाला विश्वास आहे की तो देखील पुनरागमन करेल. त्याला नवीन संधीची आवश्यकता आहे. त्याने नुकताच अंडर १९ वर्ल्डकप जिंकला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T04:18:15Z dg43tfdfdgfd