हार्दिकला कर्णधार बनवताना मुंबई इंडियन्सने कोणती मोठी चूक केली, रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने यावर्षी आयपीएलसाठी कर्णधार बनवले. पण हार्दिकला कर्णधार करत असताना मुंबई इंडियन्सने कोणती मोठी चूक केली, ते आता भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने यावर्षीच्या आयपीएलसाठी रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढले आणि हार्दिक पंड्याच्या हाती नेतृत्व सोपवले. पण ही गोष्ट करत असताना मुंबई इंंडियन्सकडून काही मोठ्या चुका घडल्या आणि त्याचाच परीणाम आता त्यांना भोगावा लागत आहे, असे दिसत आहे. कारण आतापर्यंत मुंबई इंडियन्सने तीन सामने खेळले आहेत आणि एकही सामना त्यांना जिंकता आलेला नाही. आतापर्यंतच्या आयपीएलध्ये एकही सामना न जिंकू शकलेला मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची नेमकी काय चूक झाली हे आता शास्त्री यांनी दाखवून दिले आहे.

शास्त्री यांनी सांगितले की, " हा काही भारताचा संघ नाही, तर लीगमधील संघ आहे. लीगमध्ये संघ घेत असताना त्यामागे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो. त्यामुळे संघ मालकांना कर्णधार निवडण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण ही गोष्ट करत असताना मालकांनी सुसंवाद साधणेही तेवढेच महत्वाचे आहे. जर तुम्हाला हार्दिक पंड्याला कर्णधाक करायचे आहे, तर तुम्ही म्हणू शकला असतात की, भविष्यातील काही वर्षे डोळ्यापुढे ठेवून आम्ही हा निर्णय घेत आहोत. रोहित शर्माने आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे आणि ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. पण आम्हाला वाटले की, एक संघ म्हणून मुंबई इंडियन्सला पुढे न्यायचे असेल तर पुढील तीन वर्षे रोहित शर्माने हार्दिक पंड्याची मदत करावी." रवी शास्त्री यांनी यावेळी एक सर्वात चांगला उपाय मुंबई इंडियन्सला सुचवला आहे. मुंबई इंडियन्सने जर असे सांगितले असते तर कदाचित हार्दिक पंड्या ट्रोल झाला नसता. पण मुंबई इंडियन्सने ही गोष्ट केली नाही आणि त्यामुळेच हार्दिक ट्रोल होत आहे.

रवी शास्त्री यांनी मुंबई इंडियन्सच्या वर्मावर बोट ठेवल्याचे आता पाहायला मिळत आहे. कारण मुंबई इंडियन्सने जर अशी गोष्ट केली असती तर सध्याची परिस्थिती वेगळी असली असती. त्यामुळे रवी शास्त्री यांनी जो सल्ला दिला आहे, तो योग्यच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार का, याची उत्सुकता आता सर्वांना असेल. मुंबईचा आगामी सामना हा ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-05T10:42:59Z dg43tfdfdgfd